गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंकडून पांढरेपाणी गाव दत्तक


गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंकडून पांढरेपाणी गाव दत्तक


कराड - डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गांवाला यापुर्वी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. यापुर्वी केवळ पांढरेपाणी गांवाच्या विकासाच्या गप्पाच मारल्या गेल्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता मंजुर आणला. गांवाच्या सर्वांगीण विकासाकरीता हे गांव दत्तक घेत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी यांनी केली.  


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या पांढरेपाणी (ता.पाटण) येथील गावपोहोच रस्त्याचा भूमिपुजन झाले. शंभूराज देसाईंनी १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार करण्यात आला. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परीषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथूराम कुंभार,शिवदौलत बँकेचे दगडू शेळके, भागोजी शेळके,किसन गालवे,गणेश भिसे,रमेश गालवे,आटोली सरपंच सावळाराम शेळके,उपसरपंच भिमराव जगताप, राम पवार,लक्ष्मण शेळके,दिनकर शिंदे,बंडू चाळके,दिनकर कोळेकर,आनंदा मोहिते उपस्थित होते.


मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, २०१४ च्या २०१९ च्या निवडणूकीमध्ये १०० टक्के मतदान करीत गावातील गावकऱ्यांनी एकही मत विरोधात जावू दिले नाही. गतवेळीही मतदारसंघात मताच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस या गावाने मिळविले आणि आत्ताही. येणाऱ्या आर्थिक वर्षात उर्वरीत राहिलेल्या कामांना आवश्यक निधी मंजुर करुन देणेकरीता कटीबध्द असून एक मंत्री म्हणून या गावांच्या विकासाकरीता हे गांव दत्तक घेत आहे.या गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय यंत्रणेकडील आवश्यक योजना राबविणेकरीता एक आराखडा तयार करण्यात येवून या गांवाला आवश्यक असणारी विविध विकासकामे पुर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. असे मंत्री शंभूराजे देसाई आपल्या भाषणात म्हणाले.


देसाई कुटुबांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय.


भूमिपुजन कार्यक्रम संपन्न झालेनंतर ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार केला. आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला पाठबळ देणाऱ्या देसाई कुटुंबांच्या पाठीशीच ठाम उभे राहून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत गांवातील एकही मत विरोधात न जावू देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे असे वचन ग्रामस्थांनी शंभूराज देसाईंना दिले.