काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करावी - पृथ्वीराज चव्हाण


काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करावी - पृथ्वीराज चव्हाण


कराड - काँग्रेसचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले असतानाच, 'काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करून, निवडणुकांच्या माध्यमाने कार्यकारिणी निवडावी, तरच चांगले नेते पुढे येतील', अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.


एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या चव्हाण यांनी माहिती दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'काँग्रेस कार्यकारिणीसाठी आधी निवडणूक होत होती. तेव्हा काही निवडून येत, काही अध्यक्ष नियुक्त करीत आणि जुन्या-नव्याचा संगम साधला जाई. आता फक्त नियुक्ती होते. त्यामुळे युवक काँग्रेसचे नेते आणि गुलामनबींसारखे ज्येष्ठ नेते सारखेच झाले. निवड थांबल्याने नेतृत्व विकास थांबला. निवड आणि नियुक्ती पद्धतीने तरुण आणि ज्येष्ठांचा समन्वय साधला जावा.'