सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळांचे नियोजन


सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळांचे नियोजन


सातारा :कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील  अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे  आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या अत्यावश्यक अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.



किराणा, धान्य दुकाने, मिलीट्री कॅन्टीन, डिमार्ट व दूध ई.-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


घरपोच भाजीपाला व किराणा माल-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


औषधे दुकाने-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


कृषी सेवा केंद्रे, बियाने खते व किटक नाशके यांची दुकाने-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


स्वस्त धान्य दुकान-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


पेट्रोल व डिझेल पंप-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9 व ॲम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले


हॉस्पीटल मधील औषध दुकाने-
सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9  व हॉस्पीटल मधील पेशंटसाठी कायमस्वरुपी खुले


भाजीपाला दुकाने-
सकाळी 8 ते 11


अत्यावश्यक सेवेच्या इतर सर्व आस्थापना-
सकाळी 8 ते 11


पेपर विक्री व्यवसाय/दुकाने-
सकाळी 11 पर्यंत  


इतर खाजगी बँका/ विविध कार्यकारी सोसायट्या/ विविध पतसंस्था-
सकाळी 8 ते 11


राष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँका-
शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार


एलपीजी गॅस-
दिवसभर


प्रसारमाध्यमांची अधिकृत कार्यालये-
दिवसभर