उत्तम नियोजनामूळे "सह्याद्रि" कारखाना अग्रेसर - जिल्हाधिकारी शेखर सिंह


उत्तम नियोजनामूळे "सह्याद्रि" कारखाना अग्रेसर - जिल्हाधिकारी शेखर सिंह


कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य साखर कारखाना आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक मंडळ व खातेप्रमुख यांच्या अत्यंत काटेकोर नियोजनाने चाललेला कारभार हा कौतुकास्पद असून, या नियोजनामूळे सह्याद्रि कारखाना अग्रेसर असल्याचे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले.


सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 या गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या 10 लाख 25 हजार 550 वरील 11 पोत्यांच्या पूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. संचालक मानसिंग जगदाळे व जशराज पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, संचालक, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.


जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, यापूर्वी गडचिरोली येथे कार्यरत होतो. तेथे भात व धान्य शेती मोठया प्रमाणावर होते. त्यामूळे ऊस शेतीबद्दल जास्त महिती नाही. परंतू सातारा जिल्हयामधे जास्त प्रमानावर उस क्षेत्र असल्यामूळे व सह्याद्रि सारखा अग्रेसर कारखाना या जिल्हयात असल्यामूळे उस शेती व कारखानदारीत येणार्‍या अडी-अडचणी येवू नये म्हणून केलेले उत्तम नियोजन याची माहिती घेता आली.


यावेळी जनरल मॅनेजर पी.आर.यादव यांनी प्रास्ताविक करून कारखान्याची प्रतिदिन 1250 मे.टनापासून 7500 मे.टनापर्यंत व नियोजित 11000 मे.टनाची विस्तारवाढ, शैक्षणिक सुविधा, दुष्काळ ग्रस्तांना सहाय्य, घरकुल योजना, विहीर बोअरींग योजना, गोबर गॅस योजना, पाणंद रस्ते सुधारणा योजना, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग, गो-पैदास केंद्रे, कुस्ती कलेस वाव मिळावा म्हणून कारखाना कार्यस्थळावर मानधनावरील कुस्ती स्पर्धा, कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्प, सभासद व अधिकारी कर्मचारी यांचेकरीता प्रशिक्षण वर्ग व मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, उपसा जलसिंचन योजना, स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या कराड स्मारकासाठीची आर्थिक मदत आदिबाबत सविस्तर माहिती दिली. आभार संचालक मानसिंग जगदाळे यांनी मानले.