पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड


पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड


मुंबई  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल. वर्ग 9 वी आणि 11 वी ची उर्वरित परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येईल. वर्ग दहावीचे दोन पेपर जे येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते वेळापत्रकाप्रमाणे होतील.


दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश