सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत यश


सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत यश


कराड - यशवंतनगर (ता.कराड) महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषि
संशोधन परिषद, पुणे मार्फत दरवर्षी घेण्यात येणा-या सामायिक पदव्युत्तर प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या प्रवेश परिक्षेच्या निकालामध्ये सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंतनगर, कराडच्या १५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. 


त्यामध्ये प्रणाली सुकवे (रँक-४०), अजिंक्य नाईक (रँक-९४), विशाल लिंगे (रैंक-१०७), महेश्वरी चव्हाण (रँक-१२०), मुकुंद शिंदे (रैंक-१२४), सायली जाधव (रैंक-१६०), प्राजक्ता शेवाळे (रैंक-२०७), संजना जाधव (रैंक- २१२), प्रतिक्षा कदम (रँक-२८४), विराजराव पाटील (रँक-२९५), प्रतिक्षा कांबळे (रँक-३२१), मुस्तकिम पटेल (रैंक-३६४), श्रीपाद बलखांडे (रैंक-३८७), वैभव काळे (रँक-४०५), पल्लवी लाड (रँक-४२६) यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. 


या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव बच्चे आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष मा. नामदार श्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी गायकवाड व सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक श्री आबासाहेब पाटील, कारखान्याचे सर्व अधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.